नागपूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रशासनाने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे; परंतु राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांची हानी होणार नाही, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम २८९ अन्वये सूचना मांडली. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते. मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात सध्या कांदा उपलब्ध आहे. निर्यातीसाठी अनुमती दिल्यास अडचण निर्माण होईल. शेतकर्यांची हानी होणार नाही, यासाठी सरकार कांदा खरेदी करण्यास सिद्ध आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > कांदा उत्पादक शेतकर्यांची हानी न होण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार ! – फडणवीस
कांदा उत्पादक शेतकर्यांची हानी न होण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांशी बोलणार ! – फडणवीस
नूतन लेख
- Boycott Loksabha Elections 2024 : असनिये (सिंधुदुर्ग) गावातही राजकीय प्रचाराला बंदी !
- Loksabha Elections 2024 : मी अद्याप हिंदुत्व सोडलेले नाही ! – उद्धव ठाकरे
- Goa False Ceiling Issue : सार्वजनिक बांधकाम खात्याने कला अकादमीच्या कंत्राटदाराला ठरवले निर्दाेष !
- Goa Noise Pollution : गोव्यात ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून ‘सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजना’ अधिसूचित
- आचारसंहिता लागल्याने शिवरायांची वाघनखे आणण्यास विलंब ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री
- अमरावती येथील ३ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांसह ९ जणांना अटक !