
पुत्तुरू (कर्नाटक) – लव्ह जिहादमुळे आपला धर्म त्यागून इस्लाममध्ये धर्मांतरित होणार्या तरुणींनी प्रथम, ‘आपण काय काय गमावून बसलो आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे. ‘आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका’, असे आवाहन अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या मालविका अविनाश यांनी केले. शहराच्या तेंकिल येथे ‘पुत्तूरू जिल्हा महिला संमेलना’त त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की,
१. लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतरित झालेल्या तरुणींनी त्यांच्या भविष्याविषयी गांभीर्याने विचार करावा. हिंदु धर्मात ‘एक पत्नी’ अशी पद्धत आहे. महिलांना पतीसह समान हक्क आहे; परंतु इस्लाम धर्मात बहुपत्नीत्व पद्धत आहे.
२. अन्य धर्मीयांशी विवाह करणारी हिंदु युवती तिचा समान हक्क अधिकार गमावते. एवढेच नव्हे, तर बहुपत्नीत्व असल्याने तिला एकांगी आणि एकटेपणाचे जीवन जगणे अनिवार्य होते.
३. ‘तू इस्लाम स्वीकारलास, तरच तुझ्यावर प्रेम करीन,’ असे युवक म्हणतात. हे कसले प्रेम ? याचा प्रत्येक तरुणीने अर्थ समजून घ्यावा.
४. भारतीय तत्त्वज्ञानात वेदकाळापासून पुरुष-महिला असा भेद नाही. हिंदु धर्मात इतरांनी सुधारणा केली नाही. उलट धर्मातील लोकांनी समाजात सुधारणा केली आहे. संस्कृती आणि संस्कार नष्ट करून समानता साधण्याचा उद्देश हिंदु धर्मात नाही.
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !