|

पुणे, ९ डिसेंबर (वार्ता.) – अहिल्यानगर येथील गुहा तालुक्यातील कानिफनाथ देवस्थानची ४० एकर शेतभूमी मुसलमान समाजाने वर्ष २००५ मध्ये वक्फ बोर्डाकडे अनधिकृतपणे नोंदणी करून घेतली; मात्र याविषयी गावाला कोणत्याही प्रकारे माहिती देण्यात आलेली नाही. या आधारे ते अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. या अनुषंगानेच श्री कानिफनाथ मंदिरात १३ नोव्हेंबर या दिवशी घुसून मुसलमानांनी वारकर्यांना मारहाण केली आहे, असे वक्तव्य श्री कान्होबा तथा कानिफनाथ ट्रस्ट, गुहा मंदिराचे सचिव श्री. ऋषिकेश बांगरे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
१. श्री. ऋषिकेश बांगरे पुढे म्हणाले, ‘‘आमचे वारकरी भजन करत असतांना काही मुसलमान समाजकंटकांनी आमचे वारकरी बांधव आणि भगिनी यांना धक्काबुक्की करत वारकर्यांचा अमूल्य ठेवा असलेले टाळ-मृदंग यांची तोडफोड केली, तसेच हिंदु पुजारी आणि वारकरी यांना अमानुष मारहाण केली. आता तेथील देवस्थानात हिंदू भजन करू शकतात; पण धर्मांध हे हिंदूंच्या प्रत्येक कार्यक्रमात खोडा घालून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’
२. या संदर्भात अधिवक्ता प्रसाद कोळसे म्हणाले, ‘‘या भूमीविषयी ज्या अवैध नोंदी लावलेल्या आहेत, त्याचे पुनर्विलोकन करावे आणि ती ‘ऑर्डर रिकॉल’ करण्यात यावी, असा अर्ज आम्ही वक्फ बोर्डाकडे दिला आहे; पण अजूनपर्यंत वक्फ बोर्डाने याची कोणतीही नोंद घेतली नाही. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची महसूल खात्याच्या वतीने चौकशी करण्यात यावी; म्हणून अर्ज प्रविष्ट केला आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्यांची एक समिती नियुक्त केली आहे. त्याप्रमाणे समितीने अहवाल सिद्ध करून राज्यशासनाकडे पाठवला आहे; परंतु त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.’’
संपादकीय भूमिका
|
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन