बिहारला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याचे प्रयत्न ! – राकेश मिश्रा, राष्ट्रीय महासचिव, भारतीय जनक्रांती दल

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘बिहारची धर्मनिरपेक्षता शरियाकडे ?’ या विषयावर  ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

बिहारमधील लोकांना केवळ ‘कामगार’ म्हणून अन्य राज्यांना पुरवठा करण्याचे षड्यंत्र ! – राकेश दत्त मिश्रा

बिहारचे लोक शिक्षित झाले, तर ते सरकारला प्रश्न विचारतील; म्हणून शिक्षणाचा दर्जा सुधारण्याऐवजी लोक शिक्षणापासून कसे वंचित रहातील, हे पाहिले जात आहे. बिहारमध्ये शिक्षणाचा दर्जा घसरला असून गेली १० वर्षांहून अधिक काळ शिक्षणाचे कोणतेही मूल्यमापन झालेले नाही. गेल्या ३० वर्षांत विकासाच्या नावाखाली बिहारमधील लोकांना केवळ ‘कामगार’ म्हणून अन्य राज्यांना पुरवठा करण्याचे षड्यंत्र चालू आहे.

श्री. राकेश दत्त मिश्रा

मुंबई – भारतात राज्यघटनेमध्ये समानता सांगितलेली असतांनाही बिहारमधील शाळांमध्ये हिंदूंच्या सणांच्या सुट्या न्यून करून मुसलमानांच्या सुट्या वाढवण्यात आल्या आहेत. असे पहिल्यांदा झालेले नसून अशी अनेक प्रकरणे आहेत. ‘जे राजकीय पक्ष राज्यघटना धोक्यात असल्याचे सांगत आरडाओरड करत असतात, तेच तिचे पालन करत नाहीत’, हे भारताचे दुर्भाग्य आहे. हे लोक सत्तेसाठी देश आणि समाज यांचा कोणताही विचार करायला सिद्ध नाहीत. बिहारमधील किशनगंज, पूर्णिया आदी ठिकाणी गेल्यावर आपण एखाद्या ‘इस्लामिक स्टेट’ वा पाकिस्तानमध्ये गेलो आहोत, असे वाटते. पाटणामधील कोतवाली येथे कब्रस्तानाजवळ एक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर कब्रस्तान होण्याच्या फार पूर्वीपासून असतांना ते मंदिर पाडण्याची नोटीस बिहार सरकारने पाठवली आहे. एकूणच इस्लामने ग्रासित झालेले शासनकर्ते केवळ इस्लामचा अजेंडा चालवत आहेत. येनकेन प्रकारेण बिहारला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत, असे उद्गार ‘भारतीय जनक्रांती दला’चे राष्ट्रीय महासचिव श्री. राकेश दत्त मिश्रा यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘बिहारची धर्मनिरपेक्षता शरियाकडे ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन विशेष संवादा’त बोलत होते.


बिहारमध्ये ‘नमाजवाद’ लोकांवर लादला जात आहे ! – अविनाश कुमार बादल, राष्ट्रीय प्रवक्ते, ‘हिंदु पुत्र’ संघटना

श्री. अविनाश कुमार बादल

हिंदु विद्यार्थ्यांच्या सुट्या ९, तर मुसलमान विद्यार्थ्यांना १० सुट्या देऊन ‘सेक्युलॅरिझम’ (निधर्मीवाद) आणि ‘समाजवाद’ यांच्या नावाखाली ‘नमाजवाद’ लोकांवर लादला जात आहे. हे लोक मुसलमानांच्या लांगूलचालनात इतके बुडाले आहेत की, त्यांना बहुसंख्यांक हिंदूंची कोणतीही पर्वा नाही. मध्यंतरी बिहार सरकारने मुसलमानांच्या कब्रस्तानसाठी ‘घेराबंदी’ (क्षेत्रफळ निश्चित) करण्याच्या नावाखाली अनेक खासगी आणि सरकारी भूमी बळकावल्या. बिहारचे शिक्षणमंत्री हे हिंदूंच्या ‘रामचरितमानस’वर सातत्याने आक्षेपार्ह टीका करतात, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. एकूणच बिहारमध्ये हिंदूंचे दमन चालू आहे; पण हे पुष्कळ दिवस चालणार नाही. त्याला विरोध केला जाईल.