(म्हणे) ‘मी ऐश्‍वर्या बच्चन यांच्याशी विवाह केल्याने चांगली मुले जन्माला येणार नाहीत !’ – पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाक

पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाक याने भारतीय अभिनेत्री ऐश्‍वर्या बच्चन यांच्या माध्यमांतून केली भारत आणि हिंदु यांच्यावर अश्‍लाघ्य टीका !

पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाक (मध्यभागी)

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाक याने भारतीय अभिनेत्री ऐश्‍वर्या बच्चन यांच्या माध्यमांतून भारतावर अश्‍लाघ्य टीका केली आहे. येथील मॅरियट हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना रज्जक याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डची तुलना ऐश्‍वर्या यांच्याशी करतांना ‘तुम्ही असे समजत असाल की, मी ऐश्‍वर्या यांच्याशी विवाह केल्याने होणारी मुले प्रमाणिक आणि चांगली असतील, तर असे होणार नाही; कारण त्यापूर्वी तुम्हाला तुमचा हेतू नीट करायला हवा’, असे विधान केले. या वेळी अन्य माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी हसत होता, तर अन्य लोकांनी टाळ्या वाजवल्या.

रज्जाक याच्या विधानावर भारतच नव्हे, तर पाकिस्तानी लोकांकडूनही सामाजिक माध्यमांवरून टीका होऊ लागली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदु महिलांविषयी पाकिस्तानी मुसलमानांचे असलेले विचार लक्षात घ्या ! या विधानाला भारतातील एकाही क्रिकेटपटू किंवा अन्य खेळाडू, तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी विरोध केलेला नाही. यातून भारतातील वलयांकित लोक कशा मानसिकतेचे आहेत ?, हे लक्षात येते !