माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करून खंडणी मागणार्‍या तिघांना अटक

ठाणे, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषणास बसून शासकीय अधिकार्‍याकडे २ लाख रुपयांची खंडणी मागणारे सुभाष पाटील (वय ४० वर्षे), समशाद पठाण (वय ४८ वर्षे) आणि संतोष हिरे (वय ४४ वर्षे) यांना ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.