राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विजयादशमीचा सोहळ्यात वक्तव्य
नागपूर – मणीपूर येथे हिंसाचार घडत नसून घडवला जात आहे. दशकभर शांत असलेल्या मणीपूरमध्ये अचानक हिंसाचार कसा उफाळून आला ? हिंसाचार करणार्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का ?, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केला. संघाच्या येथे झालेल्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन् उपस्थित होते.
सरसंघचालक पुढे म्हणाले…
१. देशात स्वार्थासाठी तसेच राजकीय प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी राजकीय पक्ष राष्ट्रविघातक शक्तींसमवेत संगनमत करत आहेत. असे करणे हा अविवेक आहे.
२. २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. तेथे सर्वांना येणे शक्य नाही; म्हणून प्रत्येक भारतियाने आपापल्या गावातच वेगवेगळ्या मंदिरात कार्यक्रम आयोजित करावेत.
३. काही विनाशकारी शक्ती स्वत:ला ‘सांस्कृतिक मार्क्सवादी’ म्हणतात. त्यांचा जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार आणि संयम यांस विरोध आहे. काही मूठभर लोकांचा संपूर्ण मानवजातीवर प्रभाव असावा; म्हणून ते अराजकतेचा पुरस्कार आणि प्रचार-प्रसार करत आहेत.
गायक शंकर महादेवन् यांनी सरस्वती श्लोकाने भाषणाला प्रारंभ केला. ‘अखंड भारताचा विचार, परंपरा, संस्कृती वाचवण्यात संघाचे मोठे योगदान आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !