मुंबई – मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांची समयमर्यादा दिली आहे. ‘आरक्षण घेतल्याविना शांत बसणार नाही. गिरीश महाजन यांनी आम्हाला ‘सरसकट मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतो’, असे सांगितले आहे. ‘आम्ही वेळ दिला आहे, आता टिकणारे आरक्षण द्या’, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जालना येथील अंतरवली सराटी गावात त्यांचे आंदोलन चालू आहे. मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी दौराही करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. ५ सहस्र कुणबी नोंदी पुराव्यासाठी पुष्कळ आहेत. मी पूर्वीपासून सांगतो आणि आताही सांगतो की, मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासाठी कसल्याही पुराव्याची आवश्यकता नाही. वर्ष २००४ च्या शासन आदेशानुसार, मराठा आणि कुणबी यांना सरसकट प्रमाणपत्रे देता येतात.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला ४० दिवसांची समयमर्यादा !
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला ४० दिवसांची समयमर्यादा !
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !