
जयपूर/उदयपुर (राजस्थान) – राजस्थानमधील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असतांना सरकारच्याच विरोधात भ्रष्टाचारावरून मोर्चा काढल्यामुळे मंत्रीपदावरून हटवण्यात आलेले आमदार राजेंद्र गुढा यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुढा यांनी त्यांच्या मूळ गावी पक्षात प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीका करतांना म्हटले, ‘वर्षभरापूर्वी गेहलोत म्हणाले होते, ‘गुढा यांच्यामुळे मी मुख्यमंत्री आहे.’ आता गेहलोत यांनी गुढा यांना बडतर्फ केले. गेहलोत यांनी जे केले त्याचे उत्तर जनता देईल.’
राजेंद्र सिंह गुडा हे कायम सत्यासाठी लढत आले असून सत्तेसाठी कधीच लढले नाहीत, सत्यासाठी त्यांनी सत्तेला लाथ मारली. मी देखील माझ्या ४० आमदारांच्या साथीने वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी सत्तेवर लाथ मारून बाहेर पडलो हे आमच्यात साम्य… pic.twitter.com/RBDaQBDfSW
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 9, 2023
(सौजन्य : Sach Bedhadak)
राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत लाल डायरी दाखवली होती आणि, ‘ही डायरी राजस्थान पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष धर्मेंद्रसिंह राठोड यांच्या घरावर आयकर छाप्यापूर्वी आणली होती’, असा दावा केला होता. त्या दिवशी मोठा गदारोळ झाला होता. लाल डायरीविषयी गुढा यांनी गेहलोत सरकारच्या विरोधात सातत्याने आघाडी उघडली आहे. गुढा यांनी लाल डायरीची ३ पानेही प्रसिद्ध केली होती, ज्यात राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतील व्यवहारांचा उल्लेख होता. भाजपने सातत्याने लाल डायरी हे निवडणुकीचे सूत्र बनवले आहे. भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या सभांमध्ये अमित शहांपासून पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्याने लाल डायरीच्या सूत्रावरून गेहलोत सरकारवर टीका केली होती.
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी