
नागपूर – वर्ष २०१४ मधील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रविष्ट केलेल्या प्रतिज्ञापत्रात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ गुन्हेगारी खटल्यांची माहिती दिली नसल्याच्या आरोपाच्या प्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस्.एस्. जाधव यांनी फडणवीस यांना दोषमुक्त केले आहे. ‘या गुन्ह्यांचा परिणाम निवडणुकीवर होईल असे नाही, तसेच त्यांनी कुठल्या हेतूने हे गुन्हे लपवले ?, हेही सिद्ध होत नाही. त्यामुळे फडणवीस यांना दोषमुक्त करण्यात येत आहे’, असा निकाल न्यायाधीश जाधव यांनी दिला. या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर ५ सप्टेंबर या दिवशी निकाल घोषित केला जाणार होता; मात्र न्यायालयाने तो राखून ठेवून ८ सप्टेंबर या दिवशी तो घोषित करण्यात आला.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !