राजस्थानमध्ये ९३ वर्षीय महंत सियाराम दास यांची हत्या

  • काही दिवसांपूर्वी झाली होती एका महंतांची हत्या

  • काँग्रेसच्या राजवटीत साधूसंत असुरक्षित !

जयपूर (राजस्थान) – राजस्थानमधील टोंक येथील श्री महादेव मंदिराचे महंत सियाराम दास बाबा बुरिया (वय ९३ वर्षे) यांची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. लोकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह कह्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.

महंत सियाराम दास बाबा बुरिया गेल्या ५० वर्षांपासून श्री महादेव मंदिरात राहून पूजा करत  होते. त्यांच्या हत्येमुळे संत समाजात अप्रसन्नता निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शहरवासियांनी बाजारपेठ बंद ठेवली. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील डीडवाना कुचामण जिल्ह्यात संत मोहनदास यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

राजस्थानामध्ये गुन्हेगारांकडून ऋषिमुनींना लक्ष्य करण्यात येत आहे ! – भाजप

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ‘महंत सियाराम दास बाबा यांची निर्घृण हत्या होणे, ही अतिशय दु:खद घटना आहे’, असे म्हटले आहे. शेखावत यांनी काँग्रेस सरकारवर टीका करत राजस्थानामध्ये गुन्हेगारांकडून ऋषिमुनींना लक्ष्य करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.