|

जयपूर (राजस्थान) – राजस्थानमधील टोंक येथील श्री महादेव मंदिराचे महंत सियाराम दास बाबा बुरिया (वय ९३ वर्षे) यांची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. लोकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह कह्यात घेऊन गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
महंत सियाराम दास बाबा बुरिया गेल्या ५० वर्षांपासून श्री महादेव मंदिरात राहून पूजा करत होते. त्यांच्या हत्येमुळे संत समाजात अप्रसन्नता निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शहरवासियांनी बाजारपेठ बंद ठेवली. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील डीडवाना कुचामण जिल्ह्यात संत मोहनदास यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
राजस्थानामध्ये गुन्हेगारांकडून ऋषिमुनींना लक्ष्य करण्यात येत आहे ! – भाजप
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ‘महंत सियाराम दास बाबा यांची निर्घृण हत्या होणे, ही अतिशय दु:खद घटना आहे’, असे म्हटले आहे. शेखावत यांनी काँग्रेस सरकारवर टीका करत राजस्थानामध्ये गुन्हेगारांकडून ऋषिमुनींना लक्ष्य करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त
LPG Price Hike : घरगुती सिलिंडर २९ रुपयांनी महागला
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न
रुमडामळ, मडगाव येथे मुसलमानाकडून गोरक्षक रेडकर यांच्यावर आक्रमण
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !