मणीपूरमधून म्यानमारमध्ये आश्रय घेतलेले २०० हून अधिक मैतेई राज्यात सुखरूप परतले !

इंफाळ (मणीपूर) – मणीपूर राज्यात गेल्या साडेतीन मासांपासून चालू असलेल्या हिंसाचारामुळे शेजारील म्यानमार देशात आश्रय घेतलेले मैतेई हिंदु समाजातील २०० हून अधिक नागरिक पुन्हा राज्यात परतले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांनी दिली.

या वेळी त्यांना परत आणण्यात सैन्याने बजावलेल्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले.