बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर गावठी बाँब आणि गोळीबार यांद्वारे आक्रमण : ४ जण घायाळ

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू करणार ?

कूचबिहार (बंगाल) – येथील दिनहाटा गावात भाजपच्या कार्यकर्त्यांवर गावठी बाँबद्वारे आक्रमण करण्यात आल्याचे, तसेच गोळीबारही करण्यात आल्याची घटना घडली. यात ४ कार्यकर्ते घायाळ झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. भाजपने या आक्रमणासाठी तृणमूल काँग्रेसला उत्तरदायी ठरवले आहे. बंगालमध्ये ८ जुलै या दिवशी पंचायत निवडणुका होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हिंसाचार चालू आहे. यात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण घायाळ झाले आहेत.