कलम ३७० हटवूनही काश्‍मीरमध्‍ये हिंदू सुरक्षित नाहीत !- राहुल कौल, अध्‍यक्ष, यूथ फॉर पनून कश्‍मीर, पुणे

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात ‘धर्मजागृती’ या विषयावर मान्‍यवरांनी मांडलेले तेजस्‍वी विचार !

(कलम ३७० हे जम्‍मू-काश्‍मीर राज्‍याला विशेष दर्जा देणारे कलम)

श्री. राहुल कौल

रामनाथी (गोवा) – अद्यापही सरकार काश्‍मिरी हिंदूंचा नरसंहार मान्‍य करायला सिद्ध नाही. त्‍याचा परिणाम म्‍हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्‍मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्‍मीरमधील नरसंहार मान्‍य केला जात नाही, तोपर्यंत काश्‍मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्‍य नाही. हा केवळ काश्‍मिरी हिंदूंच्‍या पुनर्वसनाचा विषय नाही, तर देशात ६० हून अधिक ठिकाणी ‘काश्‍मिरी पॅटर्न’ वापरून इस्‍लामी जिहादी डोके वर काढत आहेत. ज्‍या काश्‍मीरने भारताला भरतमुनी दिले, तो काश्‍मीर आज हिंदूमुक्‍त झाला आहे. काश्‍मिरी हिंदूंचा नरसंहार नाकारल्‍याचा हा परिणाम आहे. सद्यःस्‍थितीत काश्‍मीरमधील ९९ टक्‍के मुसलमान जिहादी विचारांचे आहेत. वर्ष १९५९ मध्‍ये नरसंहाराविषयीचा कायदा संसदेत पारित करण्‍यात आला; मात्र अद्यापही तो लागू झालेला नाही. भारतातील हिंदु धर्म नष्‍ट करायचा असेल, तर प्रथम येथील संस्‍कृती नष्‍ट करायला हवी, हे जिहाद्यांनी ओळखले आहे. काश्‍मिरी हिंदूंवर आक्रमण हे भारताची संस्‍कृती नष्‍ट करण्‍यासाठी करण्‍यात आले आहे. मागील १ सहस्र वर्षे काश्‍मिरी हिंदूंवर इस्‍लामी आक्रमणे होत आहेत, वर्ष १९९० मध्‍ये काश्‍मिरी हिंदूंचे ७ वे पलायन होते. येथील कलम ३७० हटवण्‍यात येऊन अद्यापही काश्‍मीर हिंदूंसाठी सुरक्षित नाही, ही वस्‍तूस्‍थिती आहे, असे परखड उद़्‍गार पुणे येथील ‘यूथ फॉर पनून कश्‍मीर’चे अध्‍यक्ष राहुल कौल यांनी काढले. ते वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात उपस्‍थितांना संबोधित करत होते. या वेळी व्‍यासपिठावर राजस्‍थान येथील ‘संयुक्‍त भारतीय धर्म संसद’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष आचार्य राजेश्‍वर, बेंगळुरु (कर्नाटक) येथील चित्रपट निर्माते श्री. प्रशांत संबरगी, ‘राष्‍ट्र-धर्म संघटने’चे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. संतोष केंचम्‍बा हे मान्‍यवर उपस्‍थित होते.


बौद्धिक युद्ध लढण्‍यासाठी आचार्य चाणक्‍य यांची बुद्धीमत्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आवश्‍यक ! – संतोष केंचम्‍बा, संस्‍थापक अध्‍यक्ष, राष्‍ट्र-धर्म संघटन

श्री. संतोष केंचम्‍बा

देशात खोटी कथानके (नॅरेटिव्‍ह्‌स) रचून ती सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित करण्‍याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. या माध्‍यमातून वैचारिक आक्रमण चालू आहे. हा ‘सायबर जिहाद’ आहे. हे ‘कथानक युद्ध’ निपटण्‍यासाठी योग्‍य कथा सिद्ध करून त्‍याचा प्रसार करावा लागेल. हे बौद्धिक युद्ध लढण्‍यासाठी आचार्य चाणक्‍य यांची बुद्धीमत्ता आणि छत्रपती शिवाज महाराज यांचे शौर्य अंगी असणे आवश्‍यक आहे. भारतीय संस्‍कृतीचा प्रसार योग्‍य तर्‍हेने झाला पाहिजे. हिंदु संस्‍कृतीचा प्रसार करणे, हे आपणा सर्वांचे दायित्‍व आहे. भारतातील गुरु-शिष्‍य परंपरेच्‍या अंतर्गत योग्‍य कथांच्‍या माध्‍यमातून हिंदु संस्‍कृतीचा प्रसार होत असे. ही परंपरा पुनर्जिवित करून कथांच्‍या माध्‍यमातून हिंदु संस्‍कृतीचा प्रसार करणे आवश्‍यक आहे.


हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या महायज्ञामध्‍ये प्रत्‍येक हिंदु कुटुंबातील सदस्‍यांनी आहुतीद्यावी ! – आचार्य राजेश्‍वर, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, संयुक्‍त भारतीय धर्म संसद, राजस्‍थान

आचार्य राजेश्‍वर

पूर्वी जगभर हिंदु संस्‍कृती होती. आता तेथे अन्‍य धर्मीय राज्‍य करत आहेत. काही वर्षांपूर्वी हिंदूंनी काश्‍मीरमधून पलायन केले. सध्‍या देशात ६०० ठिकाणी छोटे पाकिस्‍तान बनले आहेत. तेथूनही हिंदू हळूहळू पलायन करत आहेत. त्‍यामुळे हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करायची असेल, तर सर्व हिंदूंनी जात आणि स्‍वार्थ यांच्‍या पलीकडे जाऊन संघटित झाले पाहिजे. देशभरात अनेक जातीयवादी नेते आहेत. त्‍यांचे जातीआधारित राजकारण चालू आहे. त्‍यामुळे ते हिंदूंना संघटित होऊ देत नाहीत. हिंदु धर्माच्‍या आधारावर एकत्र येत नाहीत. देशातील सर्व संत समाजाने हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करायचे ठरवले, तर त्‍यांना थांबवण्‍याचे सामर्थ्‍य कुणातच नाही. त्‍यामुळे संतांनी हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी संघटित व्‍हावे. हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या महायज्ञामध्‍ये प्रत्‍येक हिंदु कुटुंबातील सदस्‍यांनी आहुती दिली, तर हा देश निश्‍चित हिंदु राष्‍ट्र बनेल.


‘हलालमुक्‍त भारत’ सत्‍यात उतरवण्‍यासाठी जागृती अभियान राबवूया ! – प्रशांत संबरगी, बेंगळुरू, कर्नाटक

श्री. प्रशांत संबरगी

हिंदु व्‍यापार्‍यांचा व्‍यवसाय मुसलमानांनी बळकावला आहे. मटण, चिकन विक्रीच्‍या व्‍यवसायामध्‍ये मुसलमानांनी मक्‍तेदारी निर्माण केली आहे. याचा अपलाभ उठवत मुसलमान ‘हलाल’ चिकन-मटणची विक्री करत आहेत. (हलाल मांस म्‍हणजे प्राण्‍यांचे तोंड मक्‍केच्‍या दिशेला करून त्‍यांच्‍या गळ्‍याची नस चिरली जाते आणि त्‍यांना तडफडत मरू दिले जाते.) मुसलमानांची ही मक्‍तेदारी मोडून काढण्‍यासाठी बेरोजगार हिंदु तरुणांनी या व्‍यवसायाकडे वळले पाहिजे. १५ टक्‍के मुसलमानांनी ८५ टक्‍के हिंदूंवर ‘हलाल’ पद्धत लादली आहे. हिंदूंनी ‘हलाल’ चिकन-मटण न खाता ‘झटका’ चिकन-मटण खाण्‍याचा निर्धार केला पाहिजे. (हिंदु किंवा शीख धर्मांमध्‍ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्‍यांची हत्‍या केली जाते. त्‍यात प्राण्‍यांची मान एकाच घावात कापली जात असल्‍याने त्‍यांना अल्‍प प्रमाणात त्रास होतो.) त्‍यासाठी हिंदूंनी ग्राहक हक्‍क कायद्याचा आधार घेतला पाहिजे. ‘हलालमुक्‍त भारत’ सत्‍यात उतरवण्‍यासाठी हिंदूंमध्‍ये जागृती अभियान राबवले पाहिजे. ‘हलाल’पासून मुक्‍ती मिळवण्‍यासाठी हिंदूंनी ग्राहक हक्‍क कायद्याचा आधार घेत ग्राहक मंचाकडे दाद मागितली पाहिजे. हिंदूंना ‘झटका’ मांस उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या उद्देशाने आम्‍ही कृतीदल सिद्ध केले आहे.

संपादकीय भूमिका

देशातील सर्व संत समाजाने हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करण्‍याचे ठरवणे आवश्‍यक आहे !