(म्हणे) ‘कट्टर हिंदुत्वामुळे भारताचा सामाजिक ढाचा नष्ट होत आहे !’

पाकच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांची गरळओक !

पाकच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत पाकिस्तानकडे लक्ष देऊन तो स्वतःच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आहे. कट्टर हिंदुत्वामुळे भारताचा सामाजिक ढाचा नष्ट होत आहे, अशी टीका पाकच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पाकला ‘फ्रँकस्टीन राक्षस’ (एक काल्पनिक राक्षस) संबोधले होते. त्यावर खार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

हिना रब्बानी खार यांनी पुढे म्हटले की, पाकला मुत्सद्देगिरीद्वारे अपकीर्त करण्यासाठी आणि त्याला वेगळे पाडण्याचा प्रयत्न करण्यात भारतीय नेते पंडित बनले आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिना रब्बानी खार यांनी भारतातील हिंदुत्वाकडे लक्ष देण्याची नसती उठाठेव करण्यापेक्षा गेली ७५ वर्षे जिहादी वृत्तीमुळे संपूर्ण पाकच नष्ट होत चालला आहे, त्याकडे लक्ष दिले, तर त्यांचा देश काही काळ तरी तग धरील !
  •  भारतातील हिंदुत्वामुळे धर्मांधांचे आणि जिहाद्यांचे आता धाबे दणाणले असल्याने पाकला त्याची झळ पोचू लागली आहे. त्यामुळे हिना रब्बानी खार असे विधान करत आहेत !