नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांचे जुन्या विधानावर स्पष्टीकरण

काठमांडू (नेपाळ) – भारतासमवेतचा सीमावाद सोडवण्यासाठी त्यांच्या देशाला ब्रिटनला मध्यस्थ बनवायचे नाही, असे स्पष्टीकरण नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सीमावादात ब्रिटनने मध्यस्थी करावी, असे आवाहन केले होते. आता ते म्हणाले की, माझ्या आधीच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला होता आणि नेपाळ हे सूत्र भारतासमवेत थेट चर्चेतूनच सोडवू इच्छितो.
पंतप्रधान शहा एका कार्यक्रमात म्हणाले की, कालापाणी आणि लिपुलेख यांच्याशी संबंधित ब्रिटीश राजवटीतील काही कागदपत्रे उपलब्ध आहेत. हे ऐतिहासिक पुरावे समोर आणले पाहिजेत; परंतु याचा अर्थ असा नाही की, नेपाळला कोणत्याही तिसर्या पक्षाची मध्यस्थी हवी आहे. नेपाळ त्याच्या शेजारील देशांशी स्वतः चर्चा करेल आणि सीमावादावर तोडगा काढेल. भारतासमवेतची सर्व प्रलंबित सूत्रे द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवली जातील.
मी ट्रम्प यांच्या आणि ट्रम्प माझ्या सांगण्यानुसार काम करत नाही ! – Netanyahu
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास संपूर्ण इराण नष्ट केला जाईल ! : Donald Trump
Bhopal Terror Module : ‘पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ‘मिशन-२०४७’नुसार सर्व आतंकवादी बाहेर येऊन सत्ता उलथून टाकतील !
(म्हणे) ‘भारताविरोधात युद्ध पुकारण्याविना कोणताच पर्याय रहाणार नाही !’ – Khawaja Asif
अमेरिकेने कितीही दबाव आणला, तरी लेबनॉनमधून मागे हटणार नाही ! – Israel
Bangladesh Border Tension : मालदा (बंगाल) येथून घुसखोरांना परत पाठवतांना सीमेपलीकडील बांगलादेशींकडून विरोध !