भारतासमवेतच्या सीमावादात ब्रिटनला मध्यस्थ बनवू इच्छित नाही ! – Balen Shah

नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांचे जुन्या विधानावर स्पष्टीकरण

नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा

काठमांडू (नेपाळ) – भारतासमवेतचा सीमावाद सोडवण्यासाठी त्यांच्या देशाला ब्रिटनला मध्यस्थ बनवायचे नाही, असे स्पष्टीकरण नेपाळचे पंतप्रधान बालेन शहा यांनी दिले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सीमावादात ब्रिटनने मध्यस्थी करावी, असे आवाहन केले होते. आता ते म्हणाले की, माझ्या आधीच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला होता आणि नेपाळ हे सूत्र भारतासमवेत थेट चर्चेतूनच सोडवू इच्छितो.

पंतप्रधान शहा एका कार्यक्रमात म्हणाले की, कालापाणी आणि लिपुलेख यांच्याशी संबंधित ब्रिटीश राजवटीतील काही कागदपत्रे उपलब्ध आहेत. हे ऐतिहासिक पुरावे समोर आणले पाहिजेत; परंतु याचा अर्थ असा नाही की, नेपाळला कोणत्याही तिसर्‍या पक्षाची मध्यस्थी हवी आहे. नेपाळ त्याच्या शेजारील देशांशी स्वतः चर्चा करेल आणि सीमावादावर तोडगा काढेल. भारतासमवेतची सर्व प्रलंबित सूत्रे द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवली जातील.

संपादकीय भूमिका

मुळात नेपाळने भारताशी जाणीवपूर्वक सीमावाद निर्माण केला आहे. त्याने हा खोटा दावा स्वतःहून मागे घेतला पाहिजे !