बंगालची पीडा लवकरच संपवू ! – राज्यपाल आनंद बोस

हुगळी येथे पुन्हा उसळलेला हिंसाचार

कोलकाता – हुगळी येथे पुन्हा झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आम्ही समाजकंटकांना कायदा हातात घेऊ देणार नाही. अशांवरही पोलीस कठोर कारवाई करतील. बंगाल दीर्घ काळापासून अशा घटना झेलत आहे. त्यामुळे बंगालची ही पीडा आम्ही लवकरच संपवू, असे आश्‍वासन बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी केले.

हुगळी येथे पुन्हा झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यपालांनी या भागाचा दौरा केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.