
१. मुलाच्या अपघातात अनुभवलेली गुरुकृपा !
१ अ. मुलगा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने भीती वाटणे, प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना करून त्यांच्या छायाचित्राला प्रदक्षिणा घालणे आणि त्यानंतर मुलगा घायाळ स्थितीत घरी येणे : एकदा माझा मुलगा त्याच्या मित्रांच्या समवेत पन्हाळ्याला फिरायला गेला होता. त्या वेळी आम्ही कोल्हापूर येथे नवीन सदनिकेत रहात होतो. तेथे आमची अधिक ओळख नव्हती. मी रात्री ११.३० वाजेपर्यंत माझ्या मुलाची वाट पाहिली. तो घरी आला नसल्याने मला फार भीती वाटत होती. मी प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आसंदीत ठेवले आणि त्यांना प्रार्थना केली. मी रडत-रडत रात्री २.३० वाजेपर्यंत त्या छायाचित्राला प्रदक्षिणा घालत होते. नंतर मी थकल्यामुळे आसंदीत कोलमडून पडले. तेवढ्यात दाराची घंटी वाजली आणि माझा मुलगा मला दिसला. त्याच्या तोंडवळा आणि गुडघे यांना मार लागला होता. त्याला पाहून मला धस्स् झाले. तो घरी आल्यावर मला गुरूंप्रती कृतज्ञता वाटली.
१ आ. मुलाच्या मित्राने ‘तुमच्या मुलाचा मोठा अपघात होऊनही तो गुरूंच्या कृपेने जिवंत आहे’, असे सांगणे : त्यानंतर एक मासाने मुलाचा मित्र मला म्हणाला, ‘‘आमचा अपघात झाल्यावर आम्ही अन्य गाडीतील लोकांना बोलावत होतो; पण भरधाव वेगाने जाणार्या गाड्यांतील लोकांनी आमच्याकडे लक्ष दिले नाही. तुमचा मुलगा बेशुद्ध झाला होता. मी तुमच्या गुरूंना प्रार्थना केली. मुलगा थोड्या वेळाने शुद्धीवर आला. तुमच्या गुरूंनी आम्हाला कोल्हापूर येथे आणले. तुमचे गुरु महान आहेत.’’ तेव्हा मला प.पू. भक्तराज महाराज यांना प्रदक्षिणा घालण्याचे महत्त्व लक्षात आले. गुरूंनी माझ्या मुलाला वाचवले. त्या वेळी माझी गुरूंवरील श्रद्धा वृद्धींगत झाली.
– श्रीमती भाग्यश्री मोहन आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी सेवाकेंद्र (११.१.२०२२)
|
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !