गड-दुर्गांचे रक्षण करून राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडूया !

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापले. त्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि शिवरायांनी दूरदृष्टी ठेवून उभारलेले गडदुर्ग ! आजही शिवरायांच्या स्मृती या गडदुर्गांमुळे शिवप्रेमींच्या मनामनात वास करत आहेत. हे गडदुर्ग पाहिले, तरी शिवस्फुरण चढते, पराक्रमाची ज्योत धगधगू लागते, ‘आपणही मावळा व्हावे’, असे वाटते; पण पराक्रमी इतिहासाची साक्ष लागलेल्या गडदुर्गांकडे आज शासकीय आणि प्रशासकीय स्तरांवर दुर्लक्ष होत आहे.  गडदुर्गांना इस्लामीस्तान बनवण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

हिंदु धर्मावर होणारे हे मोठ्या प्रमाणातील आक्रमण वेळीच न रोखल्‍यास आपल्‍या महान आणि गौरवशाली इतिहासाचे रूपांतर इस्‍लामीकरणात होईल. यासाठी प्रत्‍येकानेच संघटित होऊन गडदुर्गांचे रक्षण आणि संवर्धन करून शौर्यजागरण करूया अन् राष्‍ट्रकर्तव्‍य पार पाडूया !