
चंद्रपूर – सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही, तर रस्त्यावर रक्तपात होईल, असे धक्कादायक विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू आहे, तर यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सध्या सर्वोच्च न्यायालयात युक्तीवादाच्या वेळी सांगितली जात आहे. अशी सर्व परिस्थिती असतांना कोळी यांनी असे वक्तव्य केल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
ठाकरे गटाचा नेता हे काय बोलून गेला ? निर्णय बाजूने आला नाहीतर काय होणार ? खळबळजनक दावा कुणी केला ? https://t.co/6x7Egtc6H8#UddhavThackeray #cmeknathshinde #MaharashtraPoliticalCrisis
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2023
शरद कोळी म्हणाले की, आमचा आणि जनता यांचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा पंतप्रधान नरेंद्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !