
चंद्रपूर – सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही, तर रस्त्यावर रक्तपात होईल, असे धक्कादायक विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी येथे केले. एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू आहे, तर यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सध्या सर्वोच्च न्यायालयात युक्तीवादाच्या वेळी सांगितली जात आहे. अशी सर्व परिस्थिती असतांना कोळी यांनी असे वक्तव्य केल्याने सर्वांना धक्का बसला आहे.
ठाकरे गटाचा नेता हे काय बोलून गेला ? निर्णय बाजूने आला नाहीतर काय होणार ? खळबळजनक दावा कुणी केला ? https://t.co/6x7Egtc6H8#UddhavThackeray #cmeknathshinde #MaharashtraPoliticalCrisis
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2023
शरद कोळी म्हणाले की, आमचा आणि जनता यांचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा पंतप्रधान नरेंद्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ