
नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाचा हवाला देत केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव यांनी लोकसभेत माहिती देतांना सांगितले, ‘वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांत रोजंदारी करणार्या एकूण १ लाख १२ सहस्र कामगारांनी आत्महत्या केली. याच काळात ६६ सहस्र ९१२ गृहिणी, ५३ सहस्र ६६१ स्वयंरोजगार करणारे लोक, ४३ सहस्र ४२० पगारी नोकरदार, ४३ सहस्र ३८५ बेरोजगार, ३५ सहस्र ९५० विद्यार्थी आणि शेती क्षेत्राशी निगडित असलेले ३१ सहस्र ८३९ शेतीच्या संदर्भातील कामगार यांनीही आत्महत्या केलेल्या आहेत.’ देशासह जगभरात याच ३ वर्षांत कोरोनाचे संकट होते.
#UnionLabourMinister #BhupenderYadav in #LokSabha said, “A total of 1.12 lakh #dailywage #earners #committed #suicide in 2019-21″ https://t.co/r8g7gVYHbr
— Republic (@republic) February 13, 2023
केंद्रीय मंत्री यादव यांनी ही माहिती देतांना सांगितले, ‘असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८’नुसार सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी कटीबद्ध आहे. यामध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगारही येतात. या कायद्यानुसार विम्याचे सरंक्षण, आरोग्याशी संबंधित कल्याणकारी योजना बनवणे आणि मातृत्वाच्या काळात लाभ देणे, वृद्धावस्थेतील सुरक्षा आणि केंद्र सरकारच्या इतर अनेक योजनांचे लाभ देण्याची तरतूद आहे.’
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी समाजाला ‘जीवन कसे जगायचे ?’ आणि साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्ट्रात एकही आत्महत्या होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील ! |
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
वेश्याव्यवसाय संपवणे हा आमचा उद्देश नाही; कायदा केवळ त्याच्या व्यापारीकरणाच्या विरोधात ! -Supreme Court
दीड वर्षानंतर वाशी-तुर्भे लिंक रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुरुस्ती पूर्ण !
नवी मुंबईत उड्डाणपुलाखाली बकरी आणि मेंढ्या विक्रीची अनुमती रहित !