
कोल्हापूर, १ फेब्रुवारी (वार्ता.) – भारत प्रत्येक गोष्टीत पूर्वीपासून समृद्ध आहे. कोरोना महामारीच्या काळात आयुर्वेद, तसेच अन्य पद्धतींनी ते सिद्ध केले आहे. भोजनापासून भारतियांची प्रत्येक कृती आदर्श अशीच आहे; मात्र आपल्याकडे असलेल्या महान वारशाकडे आपण लक्ष देत नाही. यापुढील काळात आयुर्वेद, योग, भजन, कीर्तन, नैसर्गिक शेती यांची कास धरणे आवश्यक आहे. प्रत्येकाने समाजसेवेसाठी काही वेळ देणे आवश्यक आहे, असे आवाहन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांनी केले. ते तपोवन येथे झालेल्या महासत्संगात बोलत होते.

१ फेब्रुवारी या दिवशी श्री श्री रविशंकरजी यांनी सकाळी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी श्री श्री रविशंकरजी यांनी देवीच्या उत्सवमूर्तीला अभिषेक केला. या वेळी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे कोल्हापूर येथील प्रतिनिधी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे, श्रीपूजक श्री. केदार मुनीश्वर, तसेच अन्य उपस्थित होते.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !