कोरेगाव (जिल्‍हा सातारा) येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ !

कोरेगाव, २६ जानेवारी (वार्ता.) – येथे सकल हिंदु समाजाच्‍या वतीने नुकताच ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ पार पडला. मार्केट यार्ड येथून मोर्च्‍याला प्रारंभ होऊन हा मोर्चा तहसीलदार कार्यालय येथे पोचला. या वेळी हिंदु राष्‍ट्र सेनेचे संस्‍थापक श्री. धनंजय देसाई, ह.भ.प. शिरीष मोरे महाराज, हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. भक्‍ती डाफळे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते. त्‍यांनी मोर्च्याला संबोधित केले. यानंतर महिलांनी निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे यांना निवेदन दिले. १ सहस्रहून अधिक धर्माभिमानी हिंदु मोर्च्यात सहभागी झाले होते.


भारताचे इस्‍लामीकरण रोखा ! – धनंजय देसाई, हिंदु राष्‍ट्र सेना

लव्‍ह जिहाद, धर्मांतर तसेच गोहत्‍या सारख्‍या घटना रोखण्‍यासाठी हिंदूंना रस्‍त्‍यावर उतरावे लागत आहे. भारताचे इस्‍लामीकरण रोखण्‍यासाठी हिंदूंंनी हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी कार्यरत रहाणे आवश्‍यक आहे, असे परखड मत हिंदु राष्‍ट्र सेनेचे संस्‍थापक श्री. धनंजय देसाई यांनी व्‍यक्‍त केले.


लव्‍ह जिहाद हे धर्मांधांनी पुकारलेले धर्मयुद्धच ! – सौ. भक्‍ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

लव्‍ह जिहाद हे धर्मांधांनी पुकारलेले धर्मयुद्धच असून हिंदूंचा वंशविच्‍छेद करण्‍याचे षड्‌यंत्र आहे. हे रोखण्‍यासाठी महिलांनी धर्माचरण करून धर्मरक्षणार्थ रस्‍त्‍यावर उतरून हिंदु राष्‍ट्राची मागणी केली पाहिजे.