श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई

मुंबई, १९ जानेवारी (वार्ता.) – राज्यात एस्.टी. महामंडळामध्ये नवीन ५ सहस्र ३०० वातानुकूलित इलेक्ट्रिक गाड्या येणार आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ पर्यंत ७०० गाड्या येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गाड्या येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.
या गाड्यांच्या चार्जिंगसाठी राज्यात विविध ठिकाणी १७० केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यांतील ९ केंद्रे सिद्ध झाली असून ३ केंद्रे प्रक्रियेत आहेत. गाड्या वातानुकूलित असल्या, तरी गाड्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करण्यात येणार नाही. एस्.टी. महामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. एस्.टी. महामंडळाची बसस्थानकांची स्वच्छता मोहीम त्याचाच भाग आहे, अशी माहिती शिवाजी जगताप यांनी दिली.
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भायखळा आणि भिवंडी येथे ‘मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र’ चालू करा ! – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष
भेसळ आणि दराच्या वादात गुर्हाळ व्यवसाय संकटात !