राज्यघटनाविरोधी घोषणा देणार्‍या ईद-ए-मिलाद फेरीच्या आयोजकांविरोधात त्वरित गुन्हे नोंदवा !

  • धुळे येथे धर्मांधांनी ‘सर तन से जुदा’च्या (धडापासून शिर वेगळे करण्याच्या) घोषणा दिल्याच्या प्रकरणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

  • समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धुळेकर नागरिक यांचा मोर्चा

पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांच्याशी चर्चा करतांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी

धुळे – धुळे येथे ‘ईद-ए-मिलाद’च्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत धर्मांधांनी ‘गुस्ताख ऐ नबी की एकही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा’‘, तसेच ‘अगर भारत में रहना होगा, नारा ऐ तकबीर, अल्ला हू अकबर कहेना होगा’, अशा आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या. त्याविरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धुळेकर नागरिक यांच्या वतीने १० ऑक्टोबरला प्रतिकात्मक मोर्चा काढून या गुंडगिरीचा विरोध करण्यात आला. ‘ज्या प्रकारे कोणतीही चौकशी न करता श्रीरामनवमी उत्सव समितीच्या आयोजकांवर गुन्हे नोंदवण्यात आले, त्याचप्रमाणे राज्यघटनाविरोधी घोषणा देणार्‍या ईद-ए-मिलादच्या रॅलीच्या आयोजकांविरोधात त्वरित कारवाई करत गुन्हे नोंद करावेत’, अशी आग्रही मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात आली. या निषेध मोर्च्यानंतर पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या वेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे अधिवक्ता रोहित चांदोडे, भाजपचे श्री. हिरामणअप्पा गवळी, हर्षल विभांडीक, मनसेचे अधिवक्ता प्रसाद देशमुख, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. मनोज जैन, शिवसेनेचे श्री. गुलाब माळी, रा.स्व. संघाचे डॉ. योगेश पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. हर्षल गवळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सचिन वैद्य, इंदिरा महिला मंडळाच्या प्रभा परदेशी यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांचे अनेक कार्यकर्ते अन् पदाधिकारी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

  • एवढे दिवस धर्मांध ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत होते; आता ते ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यासाठी निमित्तच शोधत आहेत. या घोषणा देणार्‍यांना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे. जिथे जिथे धर्मांधांची संख्या वाढते, तिथे असे प्रकार चालू होतात. त्यामुळे यापुढे भारतातील बहुसंख्य हिंदूंना जीवे मारण्याच्या धमक्या देणार्‍या धर्मांधांच्या कार्यक्रमांवरच बंदी घातली पाहिजे !
  • हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून गुन्हे का नोंदवत नाहीत ?