कोरोनाकाळात ‘ख्रिस्त्यांनी असाहाय्य हिंदूंचे धर्मांतर करणे’, हा मानवतेसाठी सर्वांत मोठा कलंक ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी, इंदूर (आंध्रप्रदेश)

महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

कोरोना महामारीच्या काळात नि:स्वार्थ भावाने साहाय्य करण्याची आवश्यकता असतांना ‘हिंदूंचे धर्मांतर करणे, ही एक मोठी संधी आहे’, असे धर्मांतर करणारे मानत आणि तसा प्रयत्न करत. संकटकाळात ‘ख्रिस्त्यांनी असाहाय्य हिंदूंचे धर्मांतर करणे’, हा मानवतेसाठी सर्वांत मोठा कलंक म्हणता येईल. हिंदूंच्या देवतांविषयी घृणा निर्माण करून आणि ‘ख्रिस्ती पंथ आचरणात आणून येशूचे नाव घेतल्यावर कोरोना तुमचे काही बिघडवू शकत नाही’, असे सांगत ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर करत होते.