पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

१. संतसन्मान सोहळ्याच्या पूर्वी

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार

१ अ. त्रासदायक अनुभूती : ‘पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या आदल्या दिवशी मला त्रास होत होता. ‘मी रुग्णाईत होऊन मला या सोहळ्यात उपस्थित रहाता येऊ नये’, यासाठी मोठी वाईट शक्ती प्रयत्न करत होती.

१ आ. पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार संतपदी विराजमान होण्याच्या संदर्भात मिळालेली पूर्वसूचना : सोहळ्याची सिद्धता चालू होती. तेव्हा मला वाटले, ‘आज श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार संतपदी विराजमान होणार आहेत.’ ते रामनाथी आश्रमात जाऊन आले. ‘उत्तर भारतातील साधकांना हा सोहळा अनुभवता यावा आणि प्रत्यक्ष पहाता यावा’, यासाठी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने या सोहळ्याचे आयोजन झाले आहे.’

२. संतसन्मान सोहळ्याच्या वेळी

कु. पूनम चौधरी

अ. एकदा गुरुदेव मला पू. संजीव कुमार यांच्याविषयी म्हणाले होते, ‘‘संजीवच तुझे पिता आहेत.’’ गुरुदेवांचे बोलणे मला पू. संजीव कुमार आणि पू. माला कुमार यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी सतत आठवत होते.

‘पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांना नमस्कार करावा’, असे मला वाटत होते. गुरुदेवांच्या कृपेने मला त्यांना नमस्कार करण्याची संधी मिळाली.

आ. सोहळ्याची दिवशी माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.’

– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र (२३.१२.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक