कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी !

हिंदुत्वनिष्ठांची ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

ठाणे, ७ जुलै (वार्ता.) – कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या करणाऱ्यांना फाशी द्यावी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम आणि हनुमान मित्र मंडळाचे श्री. सुनील धामणकर अन् हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. श्रीराम यादव उपस्थित होते.