
१. ‘आतापर्यंत मी आश्रमाला भेट दिल्याच्या प्रत्येक वेळी आश्रमातील आंतरिक शांतता देणाऱ्या शांतीचा स्तर वाढलेला असतो. येथील सकारात्मकतेमुळे माझा भाव जागृत होतो आणि मला भावावस्था अनुभवता येते. आश्रमात असतांना मिळालेले समाधान आणि आत्मीयता नंतर अनेक दिवसांपर्यंत टिकून रहाते. आश्रमातील कार्य असेच निरंतर चालू राहू दे. मी माझ्या वार्षिक भेटीची आतुरतेने वाट पहात असतो.’ – श्री. अनिल धीर (राष्ट्रीय महामंत्री, भारत रक्षा मंच), सत्यनगर, भुवनेश्वर, ओडिशा.
२. ‘आश्रमातील शिस्त, व्यवस्थापन, हिंदु संस्कृतीचे जतन आणि येथील चैतन्य वाखाणण्याजोगे आहे. हे सर्व माझ्या अपेक्षेच्या पलीकडील आहे. मला आश्रमाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे.’ – अधिवक्ता पुष्पराज कामत नावेलकर, डिचोली, गोवा.
३. ‘ज्येष्ठ सांगतात की, पृथ्वीवर स्वर्ग आहे; परंतु मी पाहिलेला स्वर्ग इथेच (आश्रमातच) आहे.’ – प्रेमा शेट्टी, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (१२.६.२०२२)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी