
मुंबई – महाराष्ट्रात सातत्याने दंगलसदृश्य स्थिती निर्माण करणार्या रझा अकादमीकडून ५ जून या दिवशी मिनारा मशिदीसमोर काश्मिरी हिंदूंच्या हत्येच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाच्या वेळी ‘काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार थांबवा’, ‘काश्मीरमधील अत्याचार थांबला पाहिजे’, ‘अत्याचार करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करायला हवी’, असे फलक निदर्शकांनी हातात धरले होते. या वेळी रझा अकादमीचे अध्यक्ष महंमद सईद नुरी यांनी काश्मिरी हिंदूंच्या हत्येचा निषेध केला. वर्ष २०१२ मध्ये आझाद मैदान येथे मोर्चा काढून दंगल घडवणे, त्रिपुरामध्ये हिंदूंनी मशीद पाडल्याची अफवा पसरून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसलमानांना उसकावून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे, ठाणे येथे २ पोलिसांना जिवंत जाळणे या महाराष्ट्रातील हिंसक घटनांमागे रझा अकादमीचा हात असल्याचे उघड झाले आहे. तसेच दंगलखोरांनी महिला पोलिसांचा विनयंभग केला होता, ‘अमर जवान’ या सैनिकांच्या स्मारकाला लाथ मारून ते तोडले होते. सातत्याने हिंदूंना लक्ष्य करणार्या रझा अकादमीने काश्मिरी हिंदूंच्या हत्येच्या विरोधात केलेल्या निदर्शनाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संपादकीय भूमिकादंगली घडवून हिंदुद्वेष दर्शवणार्या ‘रझा अकादमी’चा हा प्रकार म्हणजे ‘काश्मिरी हिंदूंवरील खोट्या प्रेमाचा आलेला पुळका’ असे म्हटल्यास चूक ते काय ? |
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’