
मुंबई – महाराष्ट्रात सातत्याने दंगलसदृश्य स्थिती निर्माण करणार्या रझा अकादमीकडून ५ जून या दिवशी मिनारा मशिदीसमोर काश्मिरी हिंदूंच्या हत्येच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाच्या वेळी ‘काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार थांबवा’, ‘काश्मीरमधील अत्याचार थांबला पाहिजे’, ‘अत्याचार करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करायला हवी’, असे फलक निदर्शकांनी हातात धरले होते. या वेळी रझा अकादमीचे अध्यक्ष महंमद सईद नुरी यांनी काश्मिरी हिंदूंच्या हत्येचा निषेध केला. वर्ष २०१२ मध्ये आझाद मैदान येथे मोर्चा काढून दंगल घडवणे, त्रिपुरामध्ये हिंदूंनी मशीद पाडल्याची अफवा पसरून महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसलमानांना उसकावून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे, ठाणे येथे २ पोलिसांना जिवंत जाळणे या महाराष्ट्रातील हिंसक घटनांमागे रझा अकादमीचा हात असल्याचे उघड झाले आहे. तसेच दंगलखोरांनी महिला पोलिसांचा विनयंभग केला होता, ‘अमर जवान’ या सैनिकांच्या स्मारकाला लाथ मारून ते तोडले होते. सातत्याने हिंदूंना लक्ष्य करणार्या रझा अकादमीने काश्मिरी हिंदूंच्या हत्येच्या विरोधात केलेल्या निदर्शनाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संपादकीय भूमिकादंगली घडवून हिंदुद्वेष दर्शवणार्या ‘रझा अकादमी’चा हा प्रकार म्हणजे ‘काश्मिरी हिंदूंवरील खोट्या प्रेमाचा आलेला पुळका’ असे म्हटल्यास चूक ते काय ? |
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी