
मुंबई – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ९ मे या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकार आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात तक्रार केली. हनुमान चालिसा प्रकरणात अटक करतांना सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप राणा दांपत्याने केला आहे.
याविषयी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, आमच्यावर झालेल्या अन्यायाची लोकसभेच्या अध्यक्षांना सविस्तर माहिती आम्ही दिली. आमचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. २३ मे या दिवशी आमचे म्हणणे प्रत्यक्षरित्या आणि लेखी स्वरूपात समजून घेतले जाणार आहे.
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !