
नवी देहली – जुनी भिंत अथवा स्तंभ यांठिकाणी पूर्वीपासून धार्मिक कृती होत असल्याचे पुरावे नसतील आणि त्याचा सध्या उपयोगही होत नसेल, तर ती जागा नमाजपठणासाठी ‘धर्मिक स्थळ’ मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ‘राजस्थान वक्फ बोर्डा’च्या याचिकेवर देत ही याचिका फेटाळून लावली. यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयानेही असाच निर्णय दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने म्हटले की, या संदर्भात याचिकाकर्ते ठोस पुरावे सादर करू शकले नाही.
राज्यातील भीलवाडा येथील भूमी ‘जिंदल सा लिमिटेड’ या आस्थापनाला खाणीसाठी देण्यात आली आहे. याविरोधात ‘वक्फ बोर्डा’ने याचिका प्रविष्ट केली होती. यात म्हटले होते की, जी भूमी या आस्थापनाला देण्यात आली आहे, तेथे एक जुनी भिंत आणि स्तंभ असून त्याला ‘तिरंगा की कलंदरी मस्जिद’ म्हटले जाते. तेथे पूर्वीपासून नमाजपठण केले जाते. त्यामुळे ही जागा सुरक्षित करण्यात यावी.
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’