आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार ! – उद्योगपती रतन टाटा

दिब्रूगड (आसाम) – येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्करोग उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हे केंद्र आसाम कॅन्सर केअर फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट आणि आसाम सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने बांधले आहे. या वेळी उद्योगपती रतन टाटा यांनी ‘आता आयुष्यातील शेवटची वर्षे आरोग्य क्षेत्रासाठी समर्पित करणार आहे’, अशी घोषणा केली आहे. या वेळी त्यांचे शरीर थकलेले दिसले. बोलतांना त्यांचा आवाजदेखील थरथरत होता. अशा स्थितीतही त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.