श्रीराममंदिर, कलम ३७० नंतर आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

भोपाळ (मध्यप्रदेश) – नागरिकत्व सुधारणा कायदा, श्रीराममंदिर, कलम ३७० आणि तिहेरी तलाक यांसारख्या सूत्रांवर निर्णय झाला. आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे भाजपच्या नेत्यांच्या बैठकीत केले.  बैठकीत प्रदेश भाजपचे अध्यक्ष व्ही.डी. शर्मा, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते.