शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून खलिस्तानीवाद्यांचा देश अस्थिर करण्याचा मोठा डाव ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

खलिस्तानी चळवळीने चीन, पाकिस्तान आणि इस्लामी आतंकवादी यांच्याशी हात मिळवला असल्याची गुप्तचर संस्थांची माहिती आहे. भारताच्या इतिहासात शिखांचे मोठे योगदान आहे; मात्र शेतकरी आंदोलनाच्या माध्यमांतून शिखांना उतरवून सरकारने त्यांच्यावर गोळीबार करावा, असे वातावरण अनेकदा खलिस्तानवाद्यांनी निर्माण केले; मात्र सरकारने बळाचा वापर केला नाही. जर तसे झाले असते, तर त्या माध्यमातून देश अस्थिर करण्याचा मोठा डाव होता.