
१. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून मला पुष्कळ आनंद मिळतो. दैनिकाच्या माध्यमातून अनेक संतांचे दर्शन होते आणि त्यांचे मार्गदर्शन मिळते. ‘साधना कशी करावी ?’, हे दैनिकामुळे मला शिकायला मिळाले.
२. दैनिकामुळे मला ‘सण आणि व्रते कशी करावी ?’, हे शिकायला मिळाले. गुढीपाडव्याला गुढी उभारण्याचे शास्त्र कळले. मला ‘लक्ष्मीपूजन, दसरा, दिवाळी आणि गणेशचतुर्थी हे सण शास्त्रानुसार कसे साजरे करायचे ?’, हे दैनिकामुळे समजले.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देश आणि विदेश येथील अनेक मंदिरांना दिलेल्या भेटींविषयीच्या लेखांमुळे घरबसल्या अनेक मंदिरे अन् देवता यांविषयीची माहिती मिळते.
४. दैनिक ‘सनातन प्रभात’ हे आमचे आत्मबळ आहे. ‘उद्या दैनिकात काय वाचायला मिळेल ?’, याची मी चातकाप्रमाणे वाट पहात असते.
यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. शीतल शशिकांत दाभोलकर, नेरुल, पणजी, गोवा. (२०.५.२०२१)
निःस्वार्थी प्रेमाचे महत्त्व !
वीर सावरकर उवाच
प्रशासकीय अधिकार्यांनी अन्न-औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आदर्श घेऊन कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावी !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?