(म्हणे) ‘दंगली पेटवणारे उच्चवर्णीय आणि ब्राह्मण असतात !’

 प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांचे जातीयवादी विधान

  • म. गांधी यांच्या हत्येनंतर सहस्रो ब्राह्मणांच्या हत्या कुणी केल्या, हे सुजात आंबेडकर सांगतील का ? – संपादक
  • श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर कुणी आक्रमण केले, हेही आंबेडकर सांगतील का ? – संपादक
  • भारतातील दंगली कोण घडवतात, हे लहान पोरही सांगेल. विदेशातून आलेले सुजात आंबेडकर यांनी ‘गेल्या काही वर्षांतील दंगली कुणी घडवल्या’, याचा अभ्यास करावा ! – संपादक
  • धर्मांधांच्या दृष्टीने हिंदू मग ते कुठल्याही जातीचे असतोत, ते ‘काफीर’च असतात, हे लक्षात घेऊन सुजात आंबेडकर यांनी जातीयवादी विधाने करून हिंदूंमध्ये फूट पाडू नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
सुजात आंबेडकर

मुंबई – बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेली दंगल असो किंवा भीमा कोरेगावची दंगल असो, आपण हेच बघितले की, दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय किंवा ब्राह्मण असतात. (ब्राह्मणद्वेषापायी धर्मांध करत असलेल्या कुकृत्याचे खापर ब्राह्मणांवर फोडणारे सुजात आंबेडकर ! – संपादक)

राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल, तर स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवावे. बहुजन समाजातील पोरांना उतरवू नका, असे विद्वेषी वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी संभाजीनगर येथील एम्.जी.एम् महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना केले.