भक्तांना मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी मत मांडण्याचा पूर्ण अधिकार ! – आंध्रप्रदेश उच्च न्यायालय

अमरावती (आंध्रप्रदेश) – मंदिराच्या भक्तांना मंदिराच्या व्यवस्थापनाविषयी त्यांचे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे मत आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने एका याचिकेवर निकाल देतांना व्यक्त केले आहे.

राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील श्री महाकाली अम्मावरी मंदिराच्या प्रस्तावित पुनर्निर्माणाच्या विरोधात येल्लंती रेणुका यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे मत व्यक्त केले.