काश्मीरचा प्रश्न भारताने नाही, तर पाकने निर्माण केला आहे. त्याने त्याचा काश्मीरवरील दावा सोडून द्यावा आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत करावा ! – संपादक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जोपर्यंत काश्मीरचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणूयुद्धाची भीती कायम रहाणार आहे, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकमधील ‘जियो टीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचा दावा इम्रान खान यांनी केला.
इम्रान खान म्हणाले की, मी पाकिस्तानमध्ये सत्तेत येताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीरच्या प्रश्नावर चर्चा केली होती. मी त्यांना म्हणालो होतो की, जर तुम्ही एक पाऊल पुढे आलात, तर मी दोन पावले पुढे येईन. (पाक काश्मीरमधील जिहादी आतंकवाद का थांबवत नाही ?, याविषयी इम्रान खान का बोलत नाहीत ? – संपादक)
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !