सागरी सीमेत घुसखोरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानकडून ३६ भारतीय मासेमार्‍यांना अटक

गेली अनेक वर्षे अशा प्रकारचा आरोप करून पाक आणि श्रीलंका भारतीय मासेमार्‍यांना अटक करून त्यांच्या नौका जप्त करत असतो. यावर उपाय म्हणून मासेमार्‍यांना ‘भारताची सीमा कुठपर्यंत आहे ?’, हे लक्षात येईल, यासाठी भारत सरकार प्रयत्न का करत नाही ?

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकने त्याच्या सागरी सीमेमध्ये घुसखोरी करून मासेमारी केल्याच्या आरोपावरून भारताच्या ३६ मासेमार्‍यांना अटक करून त्यांच्या ९ नौका जप्त केल्या.

मासेमार आणि नौका यांना कराचीमध्ये नेण्यात आले आहे.