‘लव्ह जिहाद’ भारताच्या जनगणनेचे संतुलन बिघडवत आहे ! – समीर चाकू, सहसंस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक, ‘द लीगल हिंदु’ संघटना

समीर चाकू

हिंदु युवतींना जाळ्यात ओढण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ हे सामुदायिक षड्यंत्र आहे. हिंदु असल्याचे भासवून मुसलमान युवक हिंदु युवतींना या षड्यंत्रांतर्गत फसवत आहेत. हिंदु युवतीला मुसलमान युवकाशी शरियत कायद्यानुसार ‘निकाह’च करावा लागतो; पण या ‘निकाहा’नंतर त्या महिलेला संपत्ती किंवा अन्य अधिकार मिळत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘निकाह’ केल्यावर हिंदु युवतींचा छळ करून त्यांची हत्या केली जाते किंवा त्यांना वेश्या व्यवसायात पाठवले जाते, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’ भारताच्या जनगणनेचे संतुलन बिघडवत आहे.