२०.१२.२०२१ या दिवशी बांदा-पानवळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळा’ झाला. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या संदर्भातील सेवा भावपूर्ण होण्याच्या दृष्टीने साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

१. भाव ठेवून सेवा केल्यावर देवाचे साहाय्य मिळते !
‘आपण सर्वांनी भाव ठेवून सेवा करण्याचा प्रयत्न करूया. जेव्हा आपण भावपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण अनुसंधानात रहातो. जेव्हा आपण परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करतो; त्यांच्या चरणी व्यक्त कृतज्ञता करतो किंवा त्यांना शरण जातो, तेव्हा ‘ते आपल्याला कसे साहाय्य करतात ? कशा अनुभूती देतात ?’, ते आपण अनुभवतच आहोत. आपण कुणी काहीच करत नाही. तेच आपल्याकडून सर्वकाही करवून घेतात.
२. ‘प्रत्येक कृती प.पू. भक्तराज महाराज आणि गुरुदेव यांच्या चरणांपर्यंत पोचायला हवी’, यासाठी प्रयत्न करायला हवेत !
परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘हे सर्व कार्य आधीच झाले आहे. आपण केवळ निमित्तमात्र आहोत’, असे आधीच सांगितले आहे. ‘माझी प्रत्येक सेवा प.पू. भक्तराज महाराज आणि गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या चरणांपर्यंत पोचायला हवी’, यासाठी प्रयत्न केले, तर तसे होणारच आहे.
३. साधनेत भाव आणि तळमळ महत्त्वाची आहे. भाव आणि तळमळ वाढल्यावर ईश्वराचे साहाय्य मिळतेच. ते आता तुम्ही अनुभवतच आहात.
४. आपत्काळ हा साधनेसाठी सुवर्णकाळ असल्याने त्याचा लाभ करून घ्या !
एवढ्या आपत्काळातही गुरुदेवांनी आपल्याला सेवा दिली आहे. हा आपत्काळ असूनही साधकांसाठी हा सुवर्णकाळ आहे. त्याचा आपण सर्वांनी लाभ घेऊया.’
– (सद्गुरु) सत्यवान कदम, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.१२.२०२१)
सोलापूर येथील सेवाकेंद्रात गेल्यावर ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मीना नकाते (वय ६२ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘आज जी काही सेवा करता येईल ती करा, उद्या इतके साधक असतील की, तुम्हाला सेवा करण्याची संधीही मिळणार नाही !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळवण्यासाठी नवीन प्रश्न विचारण्याची कारणे आणि त्यांचे होणारे लाभ