
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – भारताला ‘भारत’ म्हणून रहायचे असेल, तर भारत ‘हिंदू’ म्हणूनच रहायला हवा. त्याचप्रमाणे हिंदूंना ‘हिंदू’ म्हणून रहायचे असेल, तर भारताला अखंड बनवावेच लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
”हिंदुंशिवाय भारत नाही”; मोहन भागवतांचे गंभीर विधान | zee 24 taashttps://t.co/C8ACBsWDyU#Zee24Taas #MarathiNews #BreakingNews #MohanBhagwat #Hindutva #MadhyaPradesh #RSS
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 28, 2021
सरसंघचालक पुढे म्हणाले की,
१. हिंदूंविना भारत नाही आणि भारताविना हिंदू नाही. भारत तुटला, पाकिस्तान उदयाला आला; कारण ‘आपण हिंदू आहोत’ हेच विसरून गेलो. प्रथम स्वतःला हिंदू समजणार्यांची शक्ती न्यून झाली आणि नंतर संख्या. त्यामुळे पाकिस्तान ‘भारत’ म्हणून राहिला नाही.
२. हा हिंदुस्तान आहे आणि येथे परंपरेने हिंदूच रहात आले आहेत. ज्या ज्या गोष्टीला ‘हिंदू’ म्हणून संबोधले जाते, त्या सगळ्यांचा विकास या भूमीत झाला आहे. भारताच्या सर्व गोष्टी भारताच्या भूमीशी जोडलेल्या आहेत. हा योगायोग नाही.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !