हिंदु राष्ट्रात मनोरंजनाचे नव्हे, तर दर्शकाला शिकायला मिळेल आणि त्याचा वेळ सत्कारणी लागेल, असे कार्यक्रम दाखवले जातील !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सध्या संकेतस्थळे, दूरचित्रवाहिन्या यांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात मनोरंजनपर कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. त्यांचा दर्शकांना काहीही लाभ न होता, त्यांचा वेळ वाया जाण्याचेच प्रमाण अधिक असते. कलियुगात मनुष्याचे जीवन अल्प आहे. या अल्प कालावधीतच मनुष्य जीवनाचे मूळ ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ साध्य करण्यासाठी वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करणे आवश्यक आहे. या कारणास्तव हिंदु राष्ट्रात दूरचित्रवाहिन्या वा अन्य कोणत्याही माध्यमांतून ‘दर्शकांना शिकायला मिळेल आणि त्यांच्या वेळेचा सदुपयोग होईल’, असेच कार्यक्रम दाखवले जातील.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले