
१. चांगले वक्तृत्व
‘सध्या ‘कोरोना’च्या दळणवळण बंदीमुळे जिल्ह्यात वाचकांचे ‘ऑनलाईन’ सत्संग चालू आहेत. त्या सत्संगात चैतन्यदादा बोलतांना त्यांचा प.पू. गुरुदेवांप्रती भाव आणि दृढ श्रद्धा जाणवते. ते जिज्ञासूंना चांगल्या प्रकारे उत्तरे देतात. दादा जिज्ञासूंचे मोजक्या शब्दांत कौतुक करून त्यांना बोलते करतात. त्यांचे हे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.
२. चांगले सूत्रसंचालन करणे
चैतन्यदादा यांच्या नावातही ‘चैतन्य’ आहे. दादा सभेचे सूत्रसंचालन करतांना त्यांच्या बोलण्यात चैतन्य जाणवते. ते अत्यंत मार्मिकपणे वक्त्यांच्या भाषणांचे सार सांगतात.
३. क्षात्रभाव
ते राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीसंबंधी घोषणा देतांना दादांमध्ये क्षात्रतेज जाणवते. त्यामुळे उपस्थितांमध्ये वीरश्री निर्माण होऊन अंगावर रोमांच उभे रहातात.
४. मुलावर चांगले संस्कार करणे
दादा व्यवसायात पुष्कळ व्यस्त असल्यामुळे त्यांच्या मुलाला थोडाच वेळ देऊ शकतात, तरी मुलाला त्यांच्याविषयी अतिशय प्रेम आणि अभिमान वाटतो. मुलगा त्यांचे अनुकरण करतो. सभेचे सूत्रसंचालन आणि घोषणा हे सर्व त्यांच्या मुलाचेही तोंडपाठ असते.’
– सौ. शारदा हुमनाबादकर, पुणे (३.७.२०२०)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
वयोवृद्ध असूनही स्वावलंबी आणि प्रेमळ असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वापी (गुजरात) येथील श्रीमती वीरमतीबेन शुक्ल (वय ८९ वर्षे)!
स्वावलंबी आणि निरपेक्ष असलेले फोंडा (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन आळशी (वय ९३ वर्षे) !
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे
सर्वांपर्यंत साधना पोचवण्याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (वय ६२ वर्षे) !