गया येथे नक्षलवाद्यांनी एकाच कुटुंबातील चौघांना फासावर लटकवले !

  • नक्षलवाद्यांचे असेे कृत्य करण्याचे धाडस होते, याचा अर्थ त्यांना पोलिसांचा वचक राहिलेले नाही. हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक
  • गेल्या ६ दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद अद्यापही संपवू न शकणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

गया (बिहार) – गया येथून ७० कि.मी. अंतरावर असलेल्या मौनवर गावात माओवाद्यांनी ४ जणांना फासावर लटकूवन त्यांची हत्या केली. हे चौघेही एकाच कुटुंबातील असून त्यांत २ महिलांचाही समावेश आहे. माओवाद्यांनी येथे एका घराला आग लावली, तसेच दुचाकी वाहन जाळले. यानंतर माओवाद्यांनी येथे एक पत्रक लावले. यावर लिहिले आहे की, मानवतेची हत्या करणार्‍या आणि विश्‍वासघात करणार्‍यांना मृत्यू दंडाखेरीज पर्याय नाही. हा अमरेश, सीता, शिवपूजन आणि उदय या आमच्या ४ सहकार्‍यांच्या हत्येचा सूड आहे. भविष्यातही अशी कारवाई चालूच रहाणार आहे.

हे पत्रक जनमुक्ती छापाकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाने लावण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयावर कुणी फारसे बोलायलाही सिद्ध नाही.