बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या निषेधासाठी दिवाळीत भारतातील हिंदू काही वेळ दिवे बंद करतील, अशी आशा ! – तस्लिमा नसरीन

हिंदूंना साहाय्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार्‍या तस्लिमा नसरीन यांचा हा विचार चांगला असला, तरी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणासाठी हिंदूंनी दिवाळीत दिवे बंद करण्यापेक्षा सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे ! – संपादक

तस्लिमा नसरीन

नवी देहली – बांगलादेशातील बंगाली हिंदूंच्या एकजुटीसाठी आणि दुर्गापूजेच्या मंडपांच्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी, भारतातील हिंदू दिवाळीत काही वेळ दिवे बंद करतील, अशी आशा आहे, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे.