भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) करण्यासाठी हिंदूंच्या धर्मांतराचे जागतिक षड्यंत्र ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, सुदर्शन न्यूज

‘भारतात धर्मांतर जिहाद !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

श्री. सुरेश चव्हाणके

मुंबई – भारतातील कट्टर मुसलमान देशाची नोकरशाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी ‘यू.पी.एस्.सी. जिहाद’ म्हणजेच ‘नोकरशाही जिहाद’ चालवत आहेत. भारताच्या ‘यू.पी.एस्.सी.’ (केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या) परीक्षेत ‘जकात फाऊंडेशन’ या संस्थेचे मुसलमान विद्यार्थी भारतातून मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण होत आहेत. अशा संघटनांना अनेक आतंकवादी संघटनांकडून अर्थपुरवठा होत आहे. ‘जकात फाऊंडेशन’च्या ‘शरीयत परिषदे’चा वरिष्ठ सल्लागार मौलाना कलीम सिद्दीकी याला धर्मांतरासह आर्थिक अपहाराच्या प्रकरणात उत्तरप्रदेश पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यामुळे सिद्दीकी हे केवळ एक प्यादे आहे. यामागे भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ (इस्लामीस्तान) करण्यासाठी हिंदूंच्या धर्मांतराचे जागतिक षड्यंत्र चालू आहे, असे रोखठोक प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भारतात धर्मांतर जिहाद !’ या विषयावर नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादात ते बोलत होते.

या परिसंवादात ‘प्रयागराज टाइम्स’चे संपादक श्री. अनुपम मिश्रा, हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनीही त्यांचे विचार मांडले. हा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम २ सहस्र ७०० हून अधिक जणांनी पाहिला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

श्री. सुरेश चव्हाणके पुढे म्हणाले की, सरकारने धर्मांतराच्या प्रकरणात आणखी काही जणांना जरी अटक केली असली, तरी हा ‘जिहाद’ अनेक मौलाना राबवत आहेत आणि ते मोकाट फिरत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा विकलांग व्यक्ती, दूरवस्तीत रहाणारे हिंदू यांना प्रथम लक्ष्य करून त्यांना धर्मांतरित केले जात आहे. गेल्या १५ मासांत केवळ बिहारमध्ये १० लाख हिंदूंचे धर्मांतर झाले असून ते आता ख्रिस्ती बनले आहेत. भारतात अन्य राज्यांतही मोठ्या प्रमाणात धर्मांतरे होत आहेत.

कट्टरतावाद्यांना हिंदूंनी संघटितपणे विरोध करणे, हा आशेचा किरण ! – अनुपम मिश्रा, संपादक, ‘प्रयागराज टाइम्स’

श्री. अनुपम मिश्रा

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी मुसलमान आणि ख्रिस्ती यांना देशात मोकळीक देण्यात आली आहे. भारतात असे कोणते राज्य आहे का की, जिथे मदरशांना आर्थिक साहाय्य आणि इमामांना वेतन दिले जात नाही ? ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या संघटना त्यांच्या संकेतस्थळावर ‘धर्मांतर करणे हा आमच्या अस्तित्वाचा मुख्य उद्देश आहे’, असे घोषित करतात. विविध ठिकाणी सरकारकडून हिंदूंचे दमन होत असतांना धर्मांतर करणारे मिशनरी, तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणारे कट्टरतावादी यांना हिंदू आता संघटितपणे विरोध करत आहेत, हा एक आशेचा किरण आहे.

देशात ‘धर्मांतरविरोधी कायदा’ करून त्याची कठोर कार्यवाही करणे आवश्यक ! – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. विश्वनाथ कुलकर्णी

आतापर्यंत हिंदूंचे आमीष दाखवून किंवा बळजोरीने मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाले आहे. ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’ आहे. धर्म आणि संस्कृती नष्ट करून आतापर्यंत मोगलांसह अन्य परकीय आक्रमकांनी भारताचे विभाजन कसे केले ? हा खरा इतिहास सांगून हिंदूंमध्ये जागृती करायला हवी. हिंदु बांधवांना हिंदु धर्माची महानता समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. देशात ‘धर्मांतरविरोधी कायदा’ आणून त्याची कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे. हिंदूंनी स्वत: धर्मपालन केले, तर त्यांच्यामध्ये धर्माविषयी अभिमान निर्माण होईल.