
(हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
अमरावती – शहरात ७ सप्टेंबर या दिवशी पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे येथील व्यापारी संकुलात पाणी शिरले आहे. यामुळे दुकानात असणार्या शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळल्या असून मूर्तीकारांची अनुमाने दीड लाख रुपयांची हानी झाली आहे. मूर्तीकर नीलेश कांचनपूरे यांनी शाडू मातीच्या ४५० श्री गणेशमूर्ती दस्तुरनगर चौक येथील एका व्यापारी संकुलात विक्रीसाठी आणल्या होत्या, तर २५० मूर्ती भूमीवरच प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे व्यापारी संकुलात पाणी शिरले. त्यामुळे भूमीवर ठेवलेल्या २५० श्री गणेशमूर्ती पाण्यात विरघळल्या आहेत.
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर