१. चिराला (आंध्रप्रदेश) येथील ‘श्रीमती आंडाळआजी मितभाषी आहेत. त्या अनावश्यक बोलत नाहीत.

२. आवड-निवड नसणे
आजींची खाण्याविषयी कोणतीही आवड-निवड नाही, तसेच त्यांना कसलीही आसक्ती नाही. त्या ‘केवळ स्वतःचे आरोग्य चांगले रहावे’; म्हणून जेवतात.
३. परिस्थिती स्वीकारणे

अ. आजींच्या मुलाला एकदा रुग्णालयामध्ये भरती केले होते. त्या वेळी त्यांना ८ दिवस दुसर्या नातेवाइकांकडे रहावे लागले. त्या वेळी त्यांनी ही परिस्थिती सहजतेने स्वीकारली.
आ. त्यांच्या नवीन घराची ‘गृहप्रवेश पूजा’ होईपर्यंत पुष्कळ उशीर झाला. त्या दिवशी त्यांनी सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते, तरीही त्या कोणतेही गार्हाणे न करता पाहुण्यांशी बोलत होत्या.
४. आजी कुणाविषयी नकारात्मक बोलत नाहीत आणि परिस्थितीलाही दूषणे देत नाहीत.
५. आजी प्रतिदिन ४ घंटे बसून नामजप पूर्ण करतात आणि त्यानंतरच घरातील कामे करतात.
६. स्थिरता

आजींच्या मोठ्या बहिणीचे निधन झाल्यावर त्या स्थिर होत्या. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘आपल्याला केवळ भगवंताशी नाते जोडायचे आहे. या संसाराशी नाही.’’
७. ‘केवळ भगवंतच प्रत्येक समस्येवर उपाय काढू शकतो’, अशी श्रद्धा असणे
त्यांच्या घरात आर्थिक अडचणी आहेत. त्यांची ‘केवळ भगवंतच प्रत्येक समस्येवर उपाय काढू शकतो’, अशी श्रद्धा आहे. एका कठीण प्रसंगात त्यांनी स्थिर राहून निर्णय घेतला. घरात कोणतीही समस्या आली, तर तिच्यावर उपाय म्हणून आजी प्रथम नामजप करतात.
८. आजींमध्ये झालेले दैवी पालट
अ. आजींचा तोंडवळा पूर्वीपेक्षा अधिक चमकदार दिसतो.
आ. आजींच्या वयोमानानुसार त्यांच्या डोक्यावरील केस पांढरे झाले होते. आता ते काळ्या रंगाचे होत आहेत आणि त्यांचे काही केस सोनेरी रंगाचे झाले आहेत.’
– सौ. मीना कदम (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), विशाखापट्टणम् आणि श्री. चेतन गाडी, भाग्यनगर
(१७.७.२०२०)
कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्या आणि देवावर श्रद्धा असणार्या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !